नवी मुंबईतील तुर्भे परिसरात 13 मार्च रोजी घडलेल्या 50 वर्षीय मर्जीला मंडल यांच्या खून प्रकरणाचा उलगडा एपीएमसी पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद अख्तर (रा. किशनगंज, बिहार) याला नेपाळमधून अटक करण्यात आली.
पोलिसांच्या तपासानुसार, मर्जीला मंडल या महिला देहविक्रीसाठी महिला पुरवण्याचे काम करत होत्या. आरोपी मोहम्मद अख्तर याने साडेचारशे रुपये दिले होते, मात्र त्याला अपेक्षित महिला न मिळाल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात अख्तर याने चाकूने वार करून तिचा खून केला.या प्रकरणाचा तपास एपीएमसी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे करत आरोपीचा माग काढला आणि नेपाळमधील झापा जिल्ह्यातून त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
